दीपाली सय्यद यांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका…

0

मुंबई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रामधील राजकारणातील टीकेची भाषा आणि पातळी कमालीची खालावली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतळी चितळेने शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याची घटना ताजी असताना आता अभिनेत्री आण शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तसेच शारीरिक रचनेवरून टीका करणाऱ्या मुख्यंमंत्र्यांना त्याच भाषेत उत्तर दिले होते. दरम्यान, आता दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर अत्यंत आक्रमक शब्दात निशाणा साधला आहे.

याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये दीपाली सय्यद म्हणाल्या की, वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, दुसरो को हल्का करने के चक्कर मे मामी का युसूफ लकडावाला से ढोंग्या. जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या, अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांचे वजन आणि वयावरून खिल्ली उडवली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांना मला सांगायचे आहे बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझे वजन १२८ किलो होते आता १०२ आहे. पण, मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही, त्यांना एफएसआयची भाषा कळते. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल तर आज माझा २ आहे आणि बाबरी पाडताना तो २.५ होता, असे ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:52 PM 17-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here