रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेत एक प्रभाग वाढलेला असून, या बदललेल्या रचनेविषयी प्रशासनाकडे अकरा हरकती प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये काही जुन्या अर्जाचाही समावेश आहे. यावर २३ मे पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीला आरंभ झाला. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार होती. त्यावर कार्यवाही केली जात होती. परंतु, ही प्रक्रिया स्थगित केली गेली. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरु झाली असून, नव्याने केलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात
हरकती मागवण्यात आल्या होत्या त्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत ११ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
यामधील काही हरकती या मार्चपूर्वीच्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावयाचा आहे. ६ जूनला प्रभागाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रत्नागिरी नगरपालिकेतील एक प्रभाग वाढला असून, दोन नगरसेवकांची भर पडली आहे. जुन्या यादीप्रमाणे पंधरा प्रभाग आणि तीस नगरसेवक होते. आता सोळा प्रभाग आणि ३२ नगरसेवक होणार आहेत. दोन जागा वाढल्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीतही वाढ होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 18-May-22