रत्नागिरी : कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जरी परिस्थिती सुधारली नाही, तर मुंबईसह सर्वच जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीही बाधित होणार आहे. कोरोना व्हायरसने सर्वच जिल्ह्यात लॉक डाऊन स्थिती निर्माण झाली असताना यापुढे शासकीय शिधा वितरण सुविधेत बदल करण्यात येणार आहे. यापुढे रास्त दराच्या धान्य दुकानावरून शिधापत्रिकाधारकाला एकाचवेळी सहा महिन्यांचे रेशन घेता येणार आहे. त्याच फायदा कोकणातील सुमारे २२ लाख शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.