रत्नागिरीत आज रत्न कृषी महोत्सवाचा शुभारंभ

0

रत्नागिरी : कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात गुरुवार, दि. १९ मेपासून रत्नकृषी महोत्सवाचे
आयोजन करण्यात आले आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते याचा प्रारंभ होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमासह शेती विषयक मार्गदर्शनही होणार आहे. स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्याया महोत्सवाची जय्यत तयारी कृषी विभागाकडून सुरू आहे.

सकाळी ११ वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहणे म्हणून पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनानंतर दु. ३ वा. कृषि पर्यटनावर वास्तुविशारद मकरंद केसरकर मार्गदर्शन करणार आहेत तर ४.३० वा. कृषि अधिकारी सुहास पंडीत हे कोकणातील शेती व शेतील संलग्न व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७ वा. सुप्रसिध्द गायक स्वप्नील बांदोडकर, अभिनेता अंशुमन विचारे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दि. २० मे रोजी स.११ वा. कृषि पणन योजनांविषयी सहाय्यक सरव्यवस्थापक मिलींद जोशी मार्गदर्शन करणार आहेत. भात व नाचणी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर डॉ. विजय दळवी हे मार्गदर्शन करणार आहेत. मत्स्य प्रक्रिया व मुल्यवर्धन या विषयावर दु.३ वा. मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वा. कोकणातील व महाराष्ट्रातील लोककलांचा कार्यक्रम होणार आहे.

दि. २१ मे रोजी जिल्हा संसाधन अधिकारी शेखर विचारे, जिल्हा अग्रणी बँकांचे व्यवस्थापक एन. डी. पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवस शेतकऱ्यांसाठी, आंबा उत्पादकांसाठी विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 19-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here