रत्नागिरी : हापूस ॲग्रो टुरिझमच्या वतीने तोणदे (ता. रत्नागिरी) येथे तीन दिवसांचा समर कॅम्प आयोजित केला होता. कॅम्पला एक भाग म्हणून आयोजित केलेल्या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेत पाच मिनिटांत साडेपाच आंबे खाऊन एका मुलाने स्पर्धा जिंकली.
तीन दिवसांमध्ये शिबिरात सहभागी मुलांनी मज्जा मस्ती करीत प्रत्यक्ष आंबे काढण्याचा अनुभव घेतला. त्याच वेळेला नदीतल्या आंघोळीची मज्जादेखील काही चिमुकल्यांसाठी काहीशी निराळीच होती.
उत्कृष्ट भोजनाबरोबर निसर्गामध्ये राहण्याचा अनुभव मुलांनी घेतला. रस्सीखेच, स्विमिंग, जंगल सफारी अशा विविध ट्रॅकचे आयोजन केले होते. कॅम्पमध्ये तिसऱ्या दिवशी जगावेगळी आंबा खाण्याची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला मुलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आंबे खात असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता, तो वेगळाच होता. तोणदे येथील हापूस ॲग्रो टुरिझमचे दीपक ऊर्फ बंधू नागवेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आंबे खाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मंथन मालगुंडकर (साडेपाच आंबे पाच मिनिटांत), द्वितीय क्रमांक : हिमानी कीर चार आंबे), तृतीय क्रमांक : राज घाणेकर (साडेतीन आंबे).
कार्यक्रमाला शाबासकी देण्यासाठी तोणदे गावचे सरपंच सचिन भुवड, तोणदे देवस्थान अध्यक्ष महेश महाकाळ, उद्योजक प्रकाश लिमये, सामाजिक कार्यकर्ते विनय फळणीकर आणि आयोजक बंधू नागवेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 23-May-22