राजापूर : तालुक्यातील आडिवरे नवेदरमधील तावडे अतिथी भवन येथे क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ मुंबईच्या वतीने चौथा वर्धापन दिनानिमित्त महिला सबलीकरणावर एकदिवसीय शिबिर झाले.
यावेळी शौर्यशक्ती हा महिला सबलीकरणासाठी कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित डॉ. अलका नाईक यांनी महिलांनी स्वतः च्या पायावर व स्वतः संस्कारक्षम होऊन संपूर्ण कुटुंबाला संस्कारक्षम केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी त्यांनी महिलांचे मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन केले.
यावेळी संतोष तावडे, सुहास तावडे, नार्वे कर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यकमाचे अध्यक्ष संतोष तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे, सुधीर तावडे, विस्तार अधिकारी अशेक सोळंके, नार्वेकर तसेच आडिवरे परिसरातील महिला उपस्थित होत्या. कार्यकमाचे सूत्रसंचालन अपर्णा तावडे व आभार सुधीर तावडे यांनी मानले.