मागच्या दोन दिवसांत भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 400 च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 89 आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही लोकांनी याचं गांभीर्य ओळखायला हवं. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.