समुपदेशनातून महिलांच्या समस्या सुटल्या; जिल्ह्यात ८३ टक्के प्रकरणी निघाला तोडगा

0

रत्नागिरी : जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. यात वादाचे बहुसंख्य प्रश्न समुपदेशनातून सुटतात असे निदर्शनास येते. गेल्या वर्षात या पध्दतीने समुपदेशनातून ८३ टक्के प्रकरणी तोडगा निघाला आहे.

महिलांना घरात असणाऱ्या समस्या तसेच घरातील वाद आणि काही वेळा कौटूंबिक वादविवाद याचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना तक्रार नोंदवून या अन्यायाविरुध्द दाद मागता येते. प्रत्येक प्रकरणी संबंधितांना समुपदेशन केल्यास यावरुन उत्तम तोडगा निघू शकतो असेही निदर्शनास आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात खेड, राजापूर, चिपळूण आणि रत्नागिरी या चार ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आली आहे. महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याचे काम या केंद्रामार्फत होते. यात थेट येणारी प्रकरणे असतात तर काही प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत येथे दाखल होतात.

जिल्ह्यात मार्च अखेर एकूण ३८३ प्रकरणे दाखल झाली होती यात महिलांनी स्वत: दाखल केलेल्या प्रकरणांची ३७२ इतकी होती. चिपळूण येथील आठ व राजापूर येथील तीन प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत दाखल करण्यात आली होती. या प्रकरणांपैकी ८३ टक्के म्हणजे ३१८ प्रकरणे वर्षभरात निकाली निघाली हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.

६५ प्रकरणी अद्यापी निकाल लागला नाही. निकाल प्रक्रियेत संरक्षण अधिकारी तसेच पोलींसाची मदत घेण्याची अनेकदा गरज भासते अशी ३३ प्रकरणे संरक्षण अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये ४६ प्रकरणी पोलीस दलाची मदत झाली आहे.

समुपदेशन केंद्रनिहाय दाखल व निकाली प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत:

रत्नागिरी
दाखल 122 निकाली 77 प्रलंबित 45

राजापूर
दाखल 61 निकाली 57 प्रलंबित 4

चिपळूण
दाखल 91 निकाली 84 प्रलंबित 7

खेड
दाखल 109 निकाली 100 प्रलंबित 9

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:12 PM 26-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here