दाभोळे येथे आगीत गोठा जळून खाक

0

साखरपा : दाभोळे येथे जनावरांचा गोठा आगीत जाळून खाक झाला आहे. गोठ्यात गुरे नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.

दाभोळे बाऊलवाडी येथे दत्ताराम सूर्या बाऊल यांच्या गोठ्याला बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. गोठ्यात पेंढा भरून ठेवला असल्याने या पेंढ्याने पेट घेतला आणि आग आणखी भडकली. सायंकाळी आग लागली त्यावेळी गुरे चरण्यासाठी गोठ्याबाहेर गेली होती. त्यामुळे जीवित हानी टळली. गोठा मात्र आगीत जळून पूर्णपणे खाक झाला आहे.

तलाठी संतोष मोघे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सुमारे दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here