मुंबई : राज्यात बंदिस्त ठिकाणी सक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अशातच आता राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे.
बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बस, ट्रेन, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सचिव व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र लिहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात बंदीस्त जागेत जिथं मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात, तिथं मास्क घालणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मात्र मास्क सक्ती लागू केलेली नाही, असं सांगण्यात आलं होतं. नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 04-Jun-22