रत्नागिरी : इतक्या कठीण स्थितीतही जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे. कर्फ्यूला जनतेचा प्रतिसाद लाभला, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले. कोरोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन मोदी यांनी देशवासीयांना केले होते. कोरोना विषाणूंची दुष्ट साखळी तोडण्याचा प्रयोग रविवारी करण्यात आला. देशवासीयांमध्ये जागरूकता आणण्याचे काम करण्यात आले. हे शक्य झाले केवळ मोदींमुळेच. असे नेतृत्व देशाला लाभले याचा अभिमान वाटतो, असे अॅड. पटवर्धन म्हणाले.