रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील दांडे येथील पूल अवजड वाहतुकीसाठी पावसाळ्यात बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली.
रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या तालुक्यांमधील छोट्या-मोठ्या पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाने (उत्तर) पावसापूर्वीची पाहणी केली. विभागातील २१३ लहा-मोठे पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत. मात्र राजापूर तालुक्यातील दांडे पूल वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याने धोकादायक पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच अंतर्गत रस्तेदेखील सुरक्षित आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:11 AM 07-Jun-22