गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांनी ‘हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकणारंच आहोत, कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील जनतेला आता कोरोना बाबतचे गांभीर्य येऊ लागले आहे. त्यामुळे आपण कोरोना विरूद्धचे युद्ध हे जिंकणार आहोत. न दिसणाऱ्या कोरोना शत्रूला आपण घरी बसून हरवूच, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:44 PM 25-Mar-20