मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 8 जून रोजी जाहीर झाला. यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन मार्फत लवकरच दहावीचे निकालही लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.
दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी बोर्ड परीक्षेचा निकाल 15 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मात्र, याबाबत बोर्डानं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. तर गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 15-Jun-22