गुहागर : मुलाचे लग्न जमत नसल्याच्या नैराश्येतून आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथे घडली आहे.
भागिर्थी गोविंद आंबेकर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. गुहागर पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे. आंबेकर या सोमवारी १३ जून रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून बेपत्ता होत्या. मंगळवारी सकाळी १० वा. किंजळीच्या झाडाला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला.
भागिर्थी, त्यांचा मुलगा व मावशी असे तिघेजण एकत्र राहत होते. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 17-Jun-22