‘आर्थिक पॅकेज’ची घोषणा हे मोदी सरकारने उचललेले योग्य पाऊल – राहुल गांधी

0

करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारच्या या कृतीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, आर्थिक पॅकेजची घोषणा हे केंद्र सरकारने योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. आपला देश शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे देणे लागतो. या सर्वांना कोरोना लॉकडाऊनची मोठी झळ बसणार आहे. त्यामुळे या घटकांना मदत करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:46 PM 26-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here