“एक बरं झालं मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले” : मनसे

0

मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ १८ आमदार असल्याचं कळतंय.

गुवाहाटीच्या हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवरून आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

“फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, सोशल डिस्टन्स, सहानभूती, नुसत्या शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी, विक्टिम कार्ड यांनीच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली. असो या सगळ्यात एक बर झालं मुख्यमंत्रांची करोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 23-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here