चिपळूण शहरातील गाढवांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

0

चिपळूण : चिपळूण शहर व गोवळकोट रोड या ठिकाणी सध्या गाढवांची संख्या वाढत आहे. ही दोन्ही ठिकाणे वर्दळीची असून वाहनचालकांना तसेच नागरिकांना या गाढवांचा खूपच उपद्रव सहन करावा लागत आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संतापाची भावना असून या गाढवांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी युवक काँगेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्री. सरगुरोह यांनी म्हटले आहे की, चिपळूण शहर व गोवळकोट रोड परिसरात सध्या गाढवांचा उपद्रव वाढला आहे. चिपळूण शहरात गाढवांची संख्या खूपच वाढली आहे. गाढव हा उपजीविकाचे साधन असून गाढव मालक कामापुरते त्यांचा वापर करून त्यांना परिसरात सोडून देत आहेत. चिपळूण शहर व गोवळकोट रोड येथील नागरिकांना तसेच वाहनचालकांना या गाढवांचा खूपच त्रास होत असून गाढवांमुळे आजपर्यंत अनेक गंभीर स्वरूपाचे अपघातही घडले आहेत. गोवळकोट रोड व चिपळूण शहर ही वर्दळीचे ठिकाणे असून भविष्यात या गाढवांमुळे एखादा अपघात घडल्यास गाढव मालकांना तसेच चिपळूण नगरपरिषदेलाही सर्वस्वी जबाबदार धरले जाईल.

त्यामुळे या गाढवांना तात्काळ कोंडवाड्यात ठेवून बंदोबस्त करावा, अशी मागणी साजिद सरगुरोह यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत श्री. सरगुरोह यांनी चिपळूण पोलिसांकडेही सादर केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:26 PM 24-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here