कोकण भुमीपुत्र/कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वारीतील भाविकांना खाद्यपदार्थांचे वाटप

0

चिपळूण : कोकण भूमीपुत्र/ कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात लक्ष्मीनगर जनता वसाहत येथे दोन दिवस मुक्कामी होती.

यावेळी या प्रतिष्ठानच्या मार्फत पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीच्या वारीमध्ये विठ्ठल दर्शनासाठी जाणारे भाविक आणि संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालख्या सुद्धा पंढरपुरात जात असतात. पायी वारी होत असल्याने ठिकठिकाणी वारकरी बांधवांना आपला मुक्काम करावा लागतो. अशा वेळी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा ही ब्रीद जपत अनेक संस्था व दानशुर व्यक्ती वारकरी व पालखी सोहळ्यातील भाविकांना मदतीचा हात देत असतात. असाच मदतीचा हात कोकण भूमीपुत्र कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठानने दिला आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे लक्ष्मीनगर जनता वसाहत येथे दोन दिवस मुक्कामी असताना या प्रतिष्ठानाच्या वतीने भाविकांना राजगिरा लाडू, वेफर्स, बिस्किटे व फरसाण अशा खाद्यपदार्थांचे वाटप केले.

यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि दानशूर व्यक्तींनी उत्तम प्रतिसाद दिला. संस्थेचे पदाधिकारी तुषार खांबे, विजय शिंदे, पुर्वेश मळेकर, ऋषिकेश लाड, ऋषिकेश कवडे, वृषाल खांबे, प्रथम हिंबरे, वैभव गोमले, प्रसाद बोले, वृषाली गोरिवले, पुजा गावडे, दर्शना निकम, सरिता बोबले, अक्षय निकम, रोहित निकम, रोहन गावडे, मिलिंद रेवाळे, सुशांत शिगवण, मोहन मळेकर, तेजस कडव, प्रथमेश जाधव, तेजस खांबे, अनिल जाधव व मंदार पाटील यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:48 PM 24-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here