मुंबई : मुंबईमध्ये 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आली आहे. यामध्ये काही अपवादात्मक बाबींना सूट देण्यात आली असून लाऊडस्पीकर वैगेरे या गोष्टींवरही बंदी घालण्यात आली आहे.
कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच आमदार, खासदार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या मुंबईत कुठेही राजकीय बॅनरबाजी होणार नाही याकडेही विशेष लक्ष देण्यात येणार असून आंदोलन किंवा हिंसा होणार याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:52 PM 25-Jun-22