Breaking : सर्वात मोठी बातमी! तातडीने अधिवेशन बोलवा, राजकीय तमाशा थांबवा; नाना पटोलेंचं राज्यपालांना आवाहन

0

➡️ मुंबई : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून राज्यात राजकीय अस्थिरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे. राज्यातील राजकीय तमाशा थांबवला पाहिजे, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. राज्यपाल कार्यालयाचा विरोधक कसा वापर करतात याचं उत्तर द्यावे. नियमाप्रमाणे काम सुरू आहे त्यावर आक्षेप घेत असतील तर त्यांना लोकशाही मान्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. गुवाहटीतील हॉटेलमध्ये 200 खोल्या बुक केल्याचं ऐकलं आहे. चार्टर्ड फ्लाईटने हे आमदार रात्री फिरतात याची ईडी चौकशी का करत नाही? बंडखोर आमदारांवर 3 हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे. याची चौकशी आता ईडी का करत नाही?, असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 27-06-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here