पेंड खाल्ल्याने दाभोळेतील पाच जनावरांचा मृत्यू

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील-दाभोळे बहुलवाडी येथील शेतकरी तुकाराम शिवगण यांच्या मालकीच्या 5 जनावरानी पेंढ (जनावरांना घालण्यात आलेल कालवण) खाल्यानंतर एकाच वेळी 5 जणांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोमवार 27 जुन रोजी सायंकाळी तुकाराम शिवगण यांनी नांगरकी करून बैलांना वाड्यात बांधले. त्यानंतर थकलेल्या सर्व जनावरांना त्यांनी पेंड घातली. आणि ते इतर कामाला लागले. मात्र याच पेंढने त्यांच्या जनावरांचा घात केला. काही वेळातच पाचही जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत 2 बैल, 1 पाडा, 1 गाय आणि 1 पाडी अशी पाच जनावरे एकाचवेळी मरण पावली. या घटनेचा पंचनामाही करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:45 PM 29-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here