”ईडीच्या वादळात अख्खा वाडा उध्दवस्त..!”

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. राज्यापालांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यात आले होते.

आज त्यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘महाविकास आघाडीच्या नेत्यानो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्याचा तुम्ही एक एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला ! देवाच्या काठीला आवाज नसतो ‘!! असे ट्विट राजू शेट्टी यांनी या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 30-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here