कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक नेते मंडळी नागरिकांना घरीच थांबा; प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन करत आहेत. मंत्री जयंत पाटील यांनीही फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. ‘आपल्याला काही होणार नाही असं समजून बाहेर पडू नका. प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. पोलीस देखील एक माणूसच आहे. त्यांच्यावर किती ताण द्यायचा. घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:21 PM 28-Mar-20