रत्नागिरी : कोरोनामुळे परिणामी लॉकडाउन झाल्यामुळे मच्छिमारांनाही संकटाला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे आता अनेक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येते. अनेक उद्योगधंद्यांना देखील याचा फटका बसलाय. पोल्ट्री व्यवसायानंतर आता मच्छीमारी व्यवसायाची देखील दयनीय परिस्थिती समोर आलीय. लॉकडाउनमुळे सध्या बोटी देखील समुद्रात नांगर टाकून उभ्याच आहेत. त्यामुळे आता मच्छिमार बेहाल झाले असून त्यांना आपल्या खिशातून खलाशांना पैसे द्यावे लागत आहेत. लॉकडाउनमुळे जवळपास 800 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालावे आणि तोडगा काढावा अशी मागणी देखील मच्छीमार बांधवांकडून केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:07 PM 28-Mar-20
