अर्जुना प्रकल्प उजवा कालवा आणि शेतीचे अंशत: नुकसान

0

रत्नागिरी : अर्जुना प्रकल्प परिसरात दिनांक 4/7/22रोजी 326 मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस झाला. सदर पावसाचे पाणी डोंगर उतारावरून वाहत उजव्या कालवा मध्ये शिरले आहे. सदर पाणी काव्यातून वाहत होते. तथापि पाण्यासोबत वाहत आलेला पालापाचोळा कालव्याच्या किलोमीटर 17 च्या उर्ध्व बाजूस असलेल्या जाळी trash rack ला अडकला गेला.

त्यामुळे प्रवाहाला अडथळा होऊन कालव्यामधून वाहणारे पावसाचे पाणी अडवले गेले. त्यामुळे कालव्याला लागून अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या चेंबरच्या भिंतीवरून पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे कालव्याचे तसेच बाजूच्या शेतीचे अंशतः नुकसान झाले आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षात प्राप्त झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:33 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here