राजापूरात पुराच्या पाण्याचा जवाहर चौकाला वेढा

0

राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे राजापूरात पुरस्थिती कायम असून पुराच्या पाण्याने मंगळवारी पुन्हा जवाहरचौकाला वेढा दिला आहे.

तर पुराच्या शक्यतेने व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. पुराचा धोका लक्षात घेऊन राजापूर शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली तर जवाहरचौकात येणारी एसटी वाहतुक सेवा बंद करण्यात आली आहे. मंगळवारी राजापूर तालुक्यात सरासरी 134.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात या हंगामात एकुण 1015.77 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. तालुक्याच्या पुर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने मंगळवारी सायंकाळी अर्जुना नदीला पूर आला. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत वेगाने शिरू लागले. मात्र सायंकाळ नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री 9 च्या सुमारास जवाहरचौक बाजारपेठ परिरातील पूर ओसरला. मात्र मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा संततधार पर्जन्यवृष्टीमुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला. पुराच्या पाण्याने जवाहरचौकाला वेढा दिला आहे.
तर पुरस्थितीमुळे राजापूर शहरातील शाळा महाविद्यालये सोडून देण्यात आली. तर जवाहरचौकाकडे येणारी एसटी वाहतुक बंद करण्यात आली. पूरस्थितीमुळे शिवाजीपथ व चिंचबांध रस्ता पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेने राजापूर नगर परिषदेने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

मंगळवारी राजापूर तालुक्या सरासरी 134.25 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये पाचल परिसरात सर्वाधिक 218 मिमी, राजापूर मंडळात 122 मिमी, ओणी परिसरात 129 मिमी, सौंदळ परिसरात 129 मिमी, कुंभवडे परिसरात 99 मिमी, नाटे मंडळात 99 मिमी, कोंडये तर्फे सौंदळ परिसरात 149 मिमी, जैतापूर मंडळात 129 मिमी पाऊस पडला आहे. तालुक्यात एकुण सरासरी 1015.77 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 06-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here