रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या सर्वत्र काळजी घेतली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 19 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत कोरोना नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या साऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच रत्नगिरीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील पाच जणांना स्वाईन फ्लुची लागण झाल्याचं समोर आलं आहे. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातून या पाच जणांवर उपचार सुरू आहेत. 5 जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:46 PM 30-Mar-20