“फक्त 50 खोके? कसले बॉक्स? मिठाईचे का?”; एकनाथ शिंदेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

0

नवी दिल्ली : “फक्त 50 खोके… खोके कसले… मिठाईचे… गंमतीचा भाग जाऊ द्या. 40 अधिक 10 हे 50 आमदार लाखो लोकातून निवडून आलेले आहेत. साधा ग्रामपंचायत सदस्य पक्ष बदलत नाही. इकडे आमदार एवढ्या प्रमाणात आले”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांची खिल्ली उडवली.

“सरकार स्थापन करण्यात फडणवीसांचं मोठं योगदान आहे. राज्याच्या विकासासाठी सदिच्छा भेटी घेतल्या. देशात आणि राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. किंबहुना जगाने दखल घेतली आहे. पण आमची जबाबदारी वाढली आहे. सर्वांना न्याय द्यायचा आहे. आमचा एक प्लसपॉइंट आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार हे प्रकल्प आम्ही पुढे नेणार आहोत. राज्याला गतवैभव आणून देऊ. कारण हे प्रकल्प मधल्या काळात रखडली होती. हे सामान्य लोकांचे प्रकल्प आहेत”, असंही शिंदे म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:47 PM 09-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here