रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांना आपल्या गावचे वेध लागले आहेत. रत्नागिरीच्या रहीवाशी असलेल्या पाचजणी मुंबईत नोकरीसाठी राहत होत्या. कोरोनामुळे गावी येण्यासाठी मुंबईतून चारचाकी गाडीने त्या रत्नागिरीत यायला निघाल्या. गाडी कुणी अडवू नये यासाठी गाडीवर प्रेस चा बोर्ड लावला. परंतू रत्नागिरीत शहरात प्रवेश करण्यापुर्वी हातखंबा येथे त्यांची चौकशी झाली. त्यात त्यांचा बनाव उघडकीस आला. सतर्क असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे आयकार्ड मागितले. मात्र त्या देऊ शकल्या नाहीत. लागलीच त्यांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:04 PM 30-Mar-20
