रत्नागिरीतील एकमेव कोरोना बाधित रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. ना. उदय सामंत म्हणाले कि विदेशातून जिल्ह्यात आलेल्या ८५८ लोकांची व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची नोंद प्रशासनाने ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी लागत असून अनेक कडक उपाययोजना कराव्या लागत असून नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे. १५ एप्रिल पर्यंत प्रशासनाला मोकळ्या हाताने काम करू द्या. भविष्यात आणीबाणी सारखी परिस्थिती उद्भवली तर जिल्हा रुग्णालयात ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर सज्ज झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या सर्व कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपला निधी वर्ग करावा असे आवाहान ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
07:34 PM 30/Mar/2020