रत्नागिरी: कोरोनाच्या संसर्गाचे कारण देत अनेक खासगी रुग्णालये आणि ओपीडी बंद ठेवण्यात आल्या आहेत; मात्र शासनांच्या सूचनांचे ते पालन करत नसतील तर त्याची चौकशी करून कायद्याने त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला. शहर आणि जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये बंद आहेत, तर काहींनी ओपीडी घेण्यास बंद केले आहे. अडचणीच्या परिस्थितीत अन्य आजारासाठी स्थानिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. याला उत्तर देताना सामंत म्हणाले, “नागरिकांची गैरसोय होत असेल आणि शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नसेल तर माहिती घेऊन कायद्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल”.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:00 AM 31-Mar-20