गरज पडल्यास जिल्हा रुग्णालय करोना रुग्णालयात रूपांतरित करण्याची प्रशासनाची तयारी

0

रत्नागिरी : करोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून विदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या ८५८ जणांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांच्या घरीच विलगीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. गरज पडल्यास रत्नागिरीचे चारशे खाटांचे जिल्हा रुग्णालय करोना रुग्णालय म्हणून तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. आगामी काळात गरज पडल्यास येथील जिल्हा रुग्णालयाला करोना रुग्णालयात बदलण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र तशी वेळ येऊ नये, यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे. जिल्हा करोना रुग्णालयात रूपांतरित झाले, तर अशा स्थितीत जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण रत्नागिरीतील खासगी रुग्णालयांकडे पाठविण्यात येतील. तेथे त्यांना जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच सेवा दिली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:48 AM 31-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here