रत्नागिरी नगर परिषदेतर्फे वक्तृत्व, गीतापठण, निबंध स्पर्धा

0

रत्नागिरी : लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त रत्नागिरी नगर परिषदेने वक्तृत्व स्पर्धा, गीतापठण स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

वक्तृत्व, गीता पठण या स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्याचबरोबर टिळकांचा वाङ्मयीन अभ्यासावर निबंध स्पर्धा असून, ही स्पर्धा खुल्या गटासाठी आहे. निबंध १५०० शब्दांपर्यंत आवश्यक असून, ते निबंध रनपच्या भांडार विभागाकडे दि.२६ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन ‘रनप’कडून करण्यात आले आहे.

या सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण १ ऑगस्ट रोजी स्वा. सावरकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता केले जाणार आहे. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:56 PM 21-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here