जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार

0

रत्नागिरी : करोना आजाराच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये रस्त्यांवर सुरू असलेली नागरिकांची वर्दळ थांबविण्यासाठी जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचविण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि चिपळूण शहरामध्ये काही सामाजिक संस्थांच्या सहभागातून ही योजना सध्या सुरू आहे. ती व्यापक स्वरूपात राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर लवकरच ग्रामीण भागात प्रत्येक गावाच्या सरपंचाशी संपर्क साधून त्याच्या प्रमुखत्वाखाली प्रत्येक गावातही घरपोच जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वर्दळीलाही अटकाव होऊ शकेल. अत्यावश्यक तेवढ्याच व्यक्ती रस्त्यावर येतील आणि रस्त्यावरची वर्दळ आणि गर्दी कमी व्हायला मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:13 AM 01-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here