नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयोगशाळेतील अग्निपथच्या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केंद्रावर केली.
दरवर्षी ६० हजार सैनिक निवृत्त होतात. त्यापैकी केवळ ३ हजार जणांना सरकारी नोकरी मिळते. अशा स्थितीत चार वर्षांच्या करारानंतर निवृत्त होणाऱ्या हजारो अग्निविरांचे भवितव्य काय असेल, असा परखड सवाल ट्वीटद्वारे केला आहे. पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेतील या नव्या प्रयोगाने देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:48 PM 25-Jul-22