रत्नागिरी : रत्नागिरीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. सेनेने कालच 9 नगरसेवक आपल्या सोबत असल्याचे सांगितले होते. मात्र आज आ. उदय सामंत रत्नागिरीत येताच चित्र पालटले आहे. आज सेनेच्या 20 नगरसेवकांनी उदय सामंत यांची भेट घेत आपण कायम आपल्या सोबतच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकारणात सामंतानी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.