”राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं”

0

पुणे : राज्यपालांनी मुंबईबाबात केलेल्या विधानावर सडकून टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या विधानाचं समर्थन केलं आहे. राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या विधानाबाबत त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी कोश्यारी यांच्या विधानाचं समर्थन केलं. ‘राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही. उलट राज्यातील नेत्यांचं राजकारण उघडं पाडलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडली’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. राज्यपालांची उचलबांगडी करण्याची गरज नाही. राज्यपाल जे बोललेत ती सत्य परिस्थिती आहे, असं आंबेडकर म्हणालेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:02 PM 30-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here