भाजपा आणि युवा मोर्चातर्फे क्रांतीदिनी तिरंगा दुचाकी फेरीचे आयोजन

0

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी आणि रत्नागिरी शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी तिरंगा दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही फेरी ९ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिरपासून माळनाका, एसटी स्टँड, राम आळी, गोखले नाका, लक्ष्मी चौक, टिळक आळी या मार्गाने स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलापर्यंत जाईल. तेथे फेरीचr सांगता होणार आहे. या फेरीमध्ये घरोघरी १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा लावण्यासंदर्भात जनजागृती, आवाहन करण्यात येणार आहे. या फेरीमध्ये रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपातर्फे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर आणि घरोघरी तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक विक्रम जैन यांनी केले आहे.

घरोघरी तिरंगा फडकवण्याची संधी केंद्र सरकारमुळे मिळाल्याची भावना सर्व देशवासीयांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तिरंगा फडकवण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय केला. या अनोख्या उपक्रमातून सर्व देशवासीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान करणाऱ्या सर्व क्रांतीवीरांना अभिवादन करणार आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे, तिरंगा फडकावण्यासंबंधी असलेल्या सर्व नियमांचे पालन करू या, असे आवाहन विक्रम जैन यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:12 PM 06-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here