रत्नागिरी : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या आजच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचा पुन्हा एकदा समावेश झाला आहे. त्यामुळे सामंत समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात आज पहिल्या टप्प्यात मुंबईत राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, डॉ. सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी, तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
या समारंभाचे थेट प्रसारण पाहिल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील सामंत समर्थक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. त्यामध्ये पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:57 PM 09-Aug-22