➡️ चिपळूण : ना. उदय सामंत यांनी आजच मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी नंतर कोकणातील राजकारणात पहिला धमाका होण्याची दाट शक्यता आहे. आमदारकीला पराभूत झाल्यानंतर अडीच वर्षात राजकीय खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. पक्षाची सत्ता असतानाही कार्यकर्त्यांना १०० रुपयाच्या रस्त्याचे कामदेखील देऊ शकलो नाही अशी खंत कालच माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केली होती. तालुक्यातील आगामी निवडणुका या माझ्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील असा इशारा देखील त्यांनी दिला होता. याच पार्शभूमीवर सदानंद चव्हाण वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत असल्याचे आता बोलले जात आहे. शिंदे गटाची कास धरून चिपळूणात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
21:20 09-08-2022