रत्नागिरी : राजिवडा येथे भरणारा मच्छी बाजार हा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोक्याचा ठरला आहे. परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्यावर या ठिकाणी पोलिसांनी कारवाई देखील केली मात्र याचा काही उपयोग झाला नाही. काल सकाळी देखील मासे खरेदीसाठी या बाजारात मोठी गर्दी होती. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी शुक्रवारी सकाळी या ठिकाणी जाऊन कारवाई केली. तसेच पोलिसांनी संचालन करून येथील नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचना केल्या. या बाजारात शहरातून देखील अनेक नागरिक मच्छी खरेदीसाठी जातात.