रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारत माता की जय, वंदे मातरम, घर घर तिरंगा हर घर तिरंगा, भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण) युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व आघाड्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काढलेल्या दुचाकी फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला.
शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे फेरीला सुरुवात झाली. ही फेरी राम आळी, गोखले नाका, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक, टिळक आळी, भारतीय जनता पार्टी कार्यालय, प्रमोद महाजन क्रीडासंकुल या मार्गाने निघाली.
यावेळी भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. अशोक कदम, सचिन करमरकर, मुन्ना चवंडे, प्रशांत डिंगणकर, राजू कीर, राजन फाळके, राजू भाटलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. घरोघरी तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक विक्रम जैन यांनी या फेरीचे नियोजन केले होते.