मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला तसंच घाबरून न जाण्याचं आवाहन देखील केलं. यावेळी त्यांनी एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू, असा आत्मविश्वास जनतेला दिला.