गुहागर : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा रूढी परंपरा प्रथा बंद करून विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा ठराव गुहागर तालुक्यातील आदर्श गाव पुरस्कार प्राप्त कोतळूक ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
सरपंच उर्मिला गोरिवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत चर्चा करून यापुढे विधवा महिलांसाठी चालत असलेली अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी सभापती विलास वाघे, लक्ष्मण शिगवण, ग्रा.पं. सदस्य सचिन ओक, सीताराम कावणकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनील भेकरे, पोलिसपाटील अनुजा वाघे, प्रगती मोहिते यांनी चर्चेत सहभाग घेतला.