विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

➡ आगामी काळात कोरोनाच्या परीस्थितीचा आढावा घेऊन सर्व परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाविद्यालय, विद्यापीठ तसेच सीईटी व इतर या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले. आज सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. श्री. सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेल कडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करून घेण्यात येइल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:42 PM 06-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here