सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 29 ऑगस्टला पुढील सुनावणीची शक्यता

0

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी आलं नाही. त्यामुळं घटनापीठापुढे होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे. या प्रकरणावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा निवृत्त होत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण आता नव्या सरन्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीसाठी येईल.

गुरुवारी पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ गठीत होऊन निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबद्दल निर्णय देणे अपेक्षित होतं. पण अद्याप या घटनापीठाची रचना नाही. या आधीही ही सुनावणी चार वेळेला पुढे ढकलली गेली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपावलं होतं, आणि या प्रकरणी गुरुवारी सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशानंतरही हे प्रकरण अद्याप कामकाजाच्या यादीत समाविष्ट नाही. ही अशा प्रकारची दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.

सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची आशा आता मावळली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 26/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here