रत्नागिरी : शनिवारी जिल्हाभरात गौरीचे आगमन झाले. वाजत-गाजत पारंपरिक पद्धतीने गौरीचे पूजन करण्यात आले.
गौरी-गणपतीच्या सणाचे कोकणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनिवारी सर्वत्र गौरीचे आगमन झाले. काही ठिकाणी सुवासिनींनी खड्याची गौर नदीकाठी, विहिरीपाशी किंवा पाणवठ्यावर जाऊन चार खडे घेऊन त्यांची पूजा केली, तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे आणून त्यांची पूजा केली. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी जिल्हाभरात सण साजरा करण्यात आला. काही ठिकाणी गौरीला तिखट नैवेद्य दाखवण्याची प्रथादेखील जोपासण्यात आली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 05/Sep/2022