कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणताही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे आमदार नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळात एकमताने घेण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर ओढावलेले मोठे संकट तूर्त टळले आहे.