पुणे : करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
पुण्यातही विसर्जन निवणुकांचा थाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेत्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. यात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी राजकीय विषयावर बोलण्यास टाळले मात्र एका वाक्यात उत्तर देत भाजपला टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना,”दोन वर्ष कोविडचे निर्बंध होते, म्हणूनच आपण आज सण साजरे करू शकतो. जर निर्बंध नसते तर उत्तर प्रदेशात जे घडले तेच इकडे घडले असते. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे मत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी पुण्यातील गणेशोत्सव अनुभवला. आतापर्यंत टीव्हीवर पाहत होतो. यावेळी प्रत्यक्ष उत्साह पाहायला मिळाला, असे ते म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:54 PM 09/Sep/2022